
भारतीय कृषी उद्योग विकसित करण्यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. आज शेती जैव-तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाळवंटात पिके उगवणे शक्य होत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, दुष्काळ परिस्थितीत जगण्यासाठी वनस्पतींचे इंजिनियरिंग करण्यात आले आहे. अनेक शास्त्रज्ञ अनुवंशिक अभियांत्रिकीद्वारे दुष्काळ आणि कीटकांना प्रतिरोधक बनविण्याच्या उद्दीष्टाने वनस्पतीतील घटकांमधील अद्वितीय वैशिष्ट्ये ओळखू शकलेले आहेत. इथं असे एक उदाहरण देता येईल, “बॅसिलस थुरिंगिन्सिस” नावाचे एक बॅक्टेरियम साठ्यासारखे कार्य करते, यामुळे पिकांना कीटक-प्रतिरोधक होण्यास सक्षम करते, म्हणून ही अनुवांशिकरित्या सुधारित पिके कीटकांच्या हस्तक्षेपाशिवाय वाढू शकतात. या तंत्रज्ञानाचा शोध विकसनशील देशांमध्ये कापसासारख्या नगदी पिके घेण्यासाठी वापरला जात आहे, कारण या अनुवांशिक अभियांत्रिकीकृत सूती रोपे कीटक प्रतिरोधक असल्याने सामान्य कापूस लागवड केलेल्या वनस्पतींपेक्षा ती चांगली वाढतात व त्यामुळे चांगले परिणाम मिळतात.
गेल्या शतकात कृषी यंत्रांचे मूलभूत तंत्रज्ञान थोडेसे बदलले आहे. ट्रॅक्टरमध्ये आणि इतर उपकरनामध्ये कापणी, धान्य वेगळे करण्यासाठी किंवा मळणीसाठी संगणकिय मॉनिटरिंग सिस्टम, जीपीएस लोकेटर, सेल्फ-स्टीयर प्रोग्राम्स किंवा सेन्सर स्थापित करून वापरण्यास सुरुवात झाली आहे. तंत्रज्ञानाने बियाणे किंवा खतांच्या वापरामध्ये अधिक तंतोतंतता आणण्यास मशीन्स ऑपरेट करण्याच्या पद्धतीत बदलत होत आहेत. भविष्यात जीपीएस नकाशे आणि इलेक्ट्रॉनिक सेन्सर वापरुन काही कृषी मशीन्स स्वयंचलीत करण्यास आणखी सक्षम केल्या जाऊ शकतील. यापेक्षाही विलक्षण म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि अनुवांशिक अभियांत्रिकीची नवीन क्षेत्रे, जिथे अनुक्रमे सब-मायक्रोस्कोपिक उपकरणे आणि जैविक प्रक्रिया नवीन आणि विविध मार्गांनी कृषीकार्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
शेतात आलेलं गवत किती आहे हे मोजण्यासाठी इंग्लंडमधील शेतकरी मोबाईल अॅप्सचा उपयोग करतात. इंग्लंड, स्कॉटलंड यासारख्या देशांमध्ये सध्या ‘फार्मग्रेज’ हे मोबाईल अॅप धुमाकूळ घालत आहे. आज रशियातील शेतकरी मोठ्या पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर करतात. यामुळे शेतकर्याचा वेळ आणि पैशाची बचत होते, मोबाईलवरच त्यांच्या जनावरांना काय खायला पाहिजे हे त्यांना कळते. सिंचन पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या वापरामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो. आधुनिक शेती तंत्रज्ञान म्हणजेच प्रायोगिक खाद्य रसायनशास्त्र, प्रायोगिक मत्स्यपालन व पशुधन उत्पादन, अन्न व औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, सिनेशिया ई-अॅग्रोटेक्नोलॉजीया, वनस्पती पॅथॉलॉजी, अॅग्रोइकोसिस्टममध्ये पौष्टिक सायकलिंग, मातीचा वापर आणि व्यवस्थापन यांचे संबंधित जर्नल्स होय.

भारतातील शेतीसाठी सध्या बदलतं हवामान हा प्रमुख अडथळा आहे असं म्हणायला हरकत नाही. ऊर्जानिर्मितीसाठी अधिकाधिक नैसर्गिक साधनं अर्थात सौर आणि वायुऊर्जा वाढवण्यासाठी तंत्रज्ञानावर भरही दिला गेला पाहिजे. हवामान बदलामुळे भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष वाढणार असल्याने पाण्याचं संतुलित संवर्धन करणं आणि त्यासाठी पर्याय शोधणं यावर अधिक भर दिला पाहिजे. यासाठी हवामान खातं अनेक कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमानं त्यातील कार्यक्षमता वाढवत आहे. शेतकर्यांकडून तंत्रज्ञान स्वीकारणे ही देशासाठी एक प्रकारची गुंतवणूकच आहे. मुख्यत: कृषीतील नावीन्य विकसित आणि आपली ओळख उमटवन्याच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक आणि पर्यावरणीय घटक महत्वाचे ठरतात. तंत्रज्ञानाने शेतीला वास्तविक व्यवसाय बनविले आहे, आता शेतकर्यांनीही प्रत्येक प्रक्रियेचे विद्युतीकरण केले आहे, ग्राहक थेट ऑनलाईन ऑर्डर देऊ शकतो आणि हे प्रमाण वाढण्यासाठी आजच्या नव्या रक्ताच्या शेतकरीवर्गाने आधुनिक तंत्रज्ञान शिकले पाहिजे, अवलंबले पाहिजे. खरे तर, पूर्वीचीच ही शेती आहे, शेती हा सर्वात जुना व्यवसाय आहे परंतु शेतीचे स्वरूप बदलत चाललं आहे. शेतीतील श्रमिकांऐवजी आता यंत्रमानव शेतीतील कामे करू लागले आहेत. यावरून पुढचा प्रश्न असा उभा ठाकतो कि शेतीवरील अवलंबून असलेल्या अनेक रोजगाराचे काय? अर्थात शेतीतील मजुरांनाही नवीन तंत्रज्ञान शिकावं लागेल. शेवटी अर्थव्यवस्था चालते ती मानवी गरजांवर. गरजा सातत्याने बदलत आलेल्या आहेत. अगदी जागतिकीकरणाआधी आपल्या ज्या गरजा होत्या त्यात आणि आजच्या गरजांत जमीन अस्मानाचा फरक आपल्याला जाणवत आहे. सध्या अनेक प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाची भारतीय शेतीला गरज आहे आणि यातूनच भविष्यातील शेतीचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे.