Search in Google

Thursday, October 18, 2012

दहशतवाद


        दहशतवादामुळे  जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी असल्या तरी आज या आपल्या विनाषाच्या बनून बसल्या आहेत काय?   ज्ञान-विज्ञानांत आपल्या समाजव्यवस्थाच्या परीघामध्ये कतीही प्रगती केली असली, तरी हिसंक आणि वर्चस्ववादी भावना थांबवण्यात आधुनिक समाजाला मिळालेले अपयश, धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज बाबत आपली अयोग्य विचारधारा या सर्व कारणांमुळे दहशतवादाला मिळणारे खात-पाणी हे आजचे जगासामोरचे सर्वात मोठे संकट आहे. दहशतवादात फक्त हिंसा होत नसते, तर शक्य त्या मार्गाने लोकांच्या मनात एखाद्या गोष्टींबद्दल भीती निर्माण करणे, त्यांची विचारधारा स्वतःकडे गहाण ठेवणे, स्व:हीताच्या रूढी-परंपरामध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करणे ई. रिक्षावाला ५० रुपयांऐवजी ७० रुपये बिल घेईन याची धास्ती मनात असणे हे दहशतवादाचेच उदाहरण आहे. भीती म्हणजेच दहशत!

       हिंसक दहशतवादाचा नाश प्रतिहिंसेने करावा अशी धारणा की सामाजिक घटकांवर पडत आहे, हि मानसिकता दहशतवादाचा नाश कधीही करू शकणार नाही, हे समीकरण बऱ्याच विचारवंतांनी मांडले आहे. तरीही काही सनातनी संघटना याच मार्गाने पुढे जाताना दिसतात, हि आपल्यासमोर चिंतेची गोष्ट आहे. एखादी हिंसक घटना झाली कि लोक जागे होतात, दहशतवाद्यांच्या धर्मावर तोंडसुख घेतले जाते. काही स्तरावर समाज ढवळून निघतो हे नैतिक आणि सामाजिक चूक भासते आहे. धर्मद्वेष, संस्कृतीद्वेष, राष्ट्रद्वेष, भाषाद्वेष, प्रांतद्वेष या बाबी  मानवी समूहाला कधी तारू शकत नाहीत. अर्थात समाजाला न तारणारी भावना, वर्चस्ववाद, दडपशाही या सर्वांपासून मानवी समाज जो अवहेलना सहन करतो त्याला दहशतवाद म्हणता येईल. 

       भारतात मानवी जीवनावर धार्मिक दहशतवाद खूप बिंबवला जातो, हा  दहशतवाद प्राचीन आहे तेव्हापासून, जेव्हा सिंधू संस्कृती, द्रविड कर्मकांड लयास गेले. शुद्र, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे मानवी वर्गीकरण म्हणजे दहशत आहे हि सांगण्याची गरज नाही. याउपर आपल्या पुरोगामी इतिहासाला काही वळणांवर चुकीचे रूप देवून बहुजणांचे मेंदू, विचारधारा, संस्कृती व  प्रगतीवादी भावना आपल्याकडे गहाण ठेवली त्यासाठी अनेक काल्पनिक कथाही इतिहास म्हणून रंगवल्या गेल्या. शुद्रांनी सनातन्यांच्या भानगडीत पडू नये हा संदेश दहशतवादानेच दिला.

          इस्लाम दहशतवाद हा केवळ अमेरिकेच्या वर्चस्ववादी धारणेतून दिसून येतो. जगात मुस्लीम राष्ट्रे भरपूर आहेत, त्यांचे संघटीकीकरण अमेरिकी वर्चस्ववादाला धोक्याचे ठरू शकते. म्हणून  एका इस्लाम राष्ट्राला अंतरराष्ट्रीय स्तरावर मदत करणे, तर दुसऱ्या इस्लाम राष्ट्राशी दहशत माजवण्या इतपत द्वेष करणे हे अमेरिकेचे धोरण दिसते. पहिल्या वा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेची वर्चस्ववादी भूमिका कोण विसरेल ? याबाबत हिरोशिमा आणि नागासाकी शहरांची अवहेलेनेचा इतिहास आपल्याला सर्व सांगून जातो.  अमेरिका हे सर्वात दहशतवादी राष्ट्र आहे असेही आरोप काही प्रख्यात विचारवंतांचे आहेत. मात्र ज्यू धर्म हा इस्लाम धर्माचा दाता आहे. इस्लाम धर्मचा मुळ शत्रू ज्यू वा ख्रिस्ती दिसतो. इस्लाम दहशतवादी हल्ल्यांमध्ये ख्रिस्ती किंवा ज्यू टारगेट केले आहेत. भारतात हल्ले करण्यामागचा यांचा उद्धेश म्हणजे भारताची अंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन व्हावी. काही ठिकाणी तर चक्क मुस्लीमहि मारले गेलेत. काश्मीर बाबत हा त्यांचा प्रांतिय दहशतवाद आहे. इस्लाम दहशतवाद भारताविरुद्ध म्हणता येईल, हिंदुविरोद्धी नव्हे. परंतु भारतातील हिंदू संघटना मात्र याचा अपप्रचार करतात आणि धार्मिक द्वेषाच्या दंगली आणि मुस्लीम राहणाऱ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणतात.   उदा. अयोध्या मंदिर-मशीद दंगल, गुजरात गोध्रा हत्याकांड, समझोता एक्स्प्रेस बोम्बस्पोट, मालेगाव बोम्बस्पोट, हैद्राबाद, नांदेड बोम्बब्लास्ट ई. हा भारतासमोर मोठा प्रश्न आहे. या व्यतिरिक्त माववादी, शिखांकडूनहि दहशतवादी कारवाया घडता आहेत. माववादी हे आदिवाशी असून हक्कासाठी बंदूक हाच त्यांचा मार्ग दिसतो. त्यांना दहशतवादी म्हणता येईल का, हा प्रश्न आहे.

        या व्यतिरिक्त पंढरपुराच्या मंदिरात होणारा पंथीय दहशतवाद, राजकीय स्तरांवर पैशाच्या आधारे राजकीय दहशतवाद, भ्रष्टाचारातून आर्थिक दहशतवाद, राजकीय भाषणातून टिंगल वा नकला करणे वा भाषिक दहशतवाद, साहित्यातून जातीय दहशतवाद वा सांस्कृतिक दहशतवाद अशी काही राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या दहशतवादाची उदाहरणे आहेत. दहशतवादाची बीजे प्राचीन काळात रुजली आहेत, त्याचे हे पडसात आहेत. जातीद्वेष, संस्कृतीद्वेष, जातीद्वेष, धर्मद्वेष, राष्ट्रद्वेष, प्रांतद्वेष, भाषाद्वेष व वर्चस्ववादी भावना जो पर्यंत नाश पावत नाही तो पर्यंत दहशतवाद नष्ट होणार नाही.