Search in Google

Showing posts with label कथात्मक. Show all posts
Showing posts with label कथात्मक. Show all posts

Saturday, February 29, 2020

समुद्र - The Moral story


एक ८० वर्षाचा म्हातारा समुद्राच्या किनारी राहत होता. त्याच्या गावात त्याला खूप प्रतिष्ठा होती. आपलं छोटंसं घर आणि छोटीशी शेती यावर तो जाम खुश होता. तो दररोज शेतातील काम करत असे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करत असे , परंतू समुद्राला हे पहावत नव्हत.  समुद्राला आपल्या विशालतेवर खूप गर्व होता.

एके दिवशी समुद्र त्या महाशयांना म्हणाला "तू स्वतःला खूप कर्तुत्ववान समजतोस का रे? या गावावर अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे आणि इतकंच  काय ? या जगावरदेखील अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे ! आता मी हे गांव बुडवणार आहे आणि त्याची सुरुवात.... त्याची सुरुवात मी तुझ्यापासून करणार आहे ! मी तुला बुडवनार.. तुझी शेती, तुझं घर.. तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... .. मैं समंदर हूं, समंदर ! लौटकर फीर से आऊंगा...  हा हा हा.... " असं हसत समुद्र थोडा वेळ शांत  झाला ... तो म्हातारा विचार करू लागला
तो घाबरला नाही...  खचला नाही, त्या वृद्धाचा अनुभव नेटका होता...  त्याच्याकडे कुशल बुद्धिमता होती... तो विचार करू लागला.... 

दोन दिवसांनी समुद्राला भरती आली.... समुद्र खवळला होता... समुद्र त्या महाशयांकडे आला आणि म्हणाला आता मी तुला बुडवणार... तुझं कर्तृत्व बुडवणार ... तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... इतक्यात ते महाशय आपल्या झोपडीत गेले आणि घरातून एक वाटीभर तेल आणले आणि समुद्रात टाकले... आणि म्हणाले... "बुडवून दाखव!"

- गणेश आटकळे 
 15-12-2019

Sunday, September 9, 2018

खरं तर! असं घडलं!

        होस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप उशिरा जेवायला जायचा, उशीराच झोपायचा. होस्टेलवरही लोडशेडींगमुळं लाईट जायची. लाईट जाऊ नये म्हणून आम्ही होस्टेलच्या रेक्टरकडे वेळोवेळी तक्रारही केली होती. लाईट गेल्यावर आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, मोठ्या आवाजात गाणी म्हणायचो, पंजा फाईट खेळायचो. एकदा असंच पंजा फाईट खेळताना जास्त गोंधळ झाला होता, गोंधळावरून होस्टेलमागे राहणाऱ्या तिथल्या लोकल मुलांनी महाराष्ट्राबाहेरील मुलांची रॅगिंगही घेतली होती.  रात्रीचे दोन-तीन वाजल्याचे भानसुद्धा आम्हाला राहत नसत. मी आणि अभिजित वांढेकर एका रूममध्ये राहत होतो. तर एका बाजूच्या रुममध्ये अजिंक्य स्वामी आणि विल्यम फर्नांडीस हे दोघेही कोल्हापूरचे. आणि दुसऱ्या बाजूच्या रुममध्ये साताऱ्याचा मयूर केंजळे आणि पुण्याचा विक्रांत पिटके. वरच्या मजल्यावरून सातारचा अमरजित यवतकर अधून-मधून आमच्या ग्रुपमध्ये यायचा. आम्ही अभिजित वांढेकरला वांड्या म्हणायचो, विक्रांत पिटकेला पिटक्या, विल्यमला विल्ल्या, अमरजीतला आमऱ्या आणि मयूरला मयऱ्या! अशी अजब नावं आमच्या मुखी असायची. माझं बारावीपर्यंत सगळ शिक्षण पंढरपूरला झालं होत. इंजिनीअरिंगसाठी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. नवीन कॉलेज, नवीन मित्र, नवा परिसर अगदी मजेचे दिवस चालले होते. कॉलेज सुटल्यावर आम्ही क्रिकेट खेळायचो तर शनिवार-रविवार गाठून कधी कोल्हापूरचा परिवार फिरायला जायचो. कधी रंकाळा, कधी ज्योतिबा, पन्हाळा तर कधी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला. बाकीच्या मुलांचेही ग्रुप बनले होते. कुणाचे ग्रुप ज्यांच्या-त्यांच्या गावांप्रमाणे तर कुणाचे इंजिनीअरिंगच्या ब्रांचप्रमाणे. पण आमच्या ग्रुपमध्ये असं काहीही नव्हतं. ग्रुप कसला! वेड्यांचा बाजार नुस्ता! माझ्या कॉलेजलाईफमधला एकही दिवस असा गेला नाही कि मी वांड्याची अक्कल काढली नाही. बरोबर अजिंक्य, विल्ल्या , मयऱ्या, पिटक्या मजा घ्यायला असतच. पण वांड्या कधी चिडायचा नाही, कारण वांड्या चिडला की आमच्या चेहऱ्यावर भलताच राक्षसी आंनंद चढायचा. मग कधी आम्ही पुण्याचे पिटके महाशय, तर कधी मयऱ्याकडे वळायचो, असा एकामागून एकाचा पोपट करायचा आणि खिदळत बसायचं. अधूनमधून कुणी आपले किस्से सांगत असत. आमची पहिली सेमिश्टर अशीच मजा करत संपली होती. बऱ्याच जणांचे विषय राहिले होते. कुणाचा मॅथ्स-एक, कुणाचा ग्राफिक्स, कुणाचा फिजिक्स वगैरे, वगैरे. कॉलेजच सबमिशन जवळ आलं होतं. होस्टेलवर सगळी पोरं एकमेंकांच जर्नल्स घेवून सबमिशन पूर्ण करत होती. ड्रॉईंगचा आभ्यास करत असताना मयऱ्याने वांड्याला टोमणा मारला "प्लँचेटवर वाटी जशी फिरते तसं ड्रॉईंग काढतोयस रे...." "असू दे, काढू डे कसं तरी... ग्राफिक्समध्ये पास होणं महत्वाचं आहे." म्हणत वांड्याने स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष करत ड्रॉईंग चालू ठेवलं. माझ्या शीटवर मारलेली रेघ मी अर्ध्यावर सोडत वरती पाहिलं आणि मयऱ्याला विचारलं "हा काय प्रकार असतो?" "आ...रे तो आत्म्याचा प्रकार आहे, भविष्यात काय होणार आहे ते समजतं त्याने...! जावू दे, तू आभ्यास कर."
"खरं की काय?" मी कुतूहलतेने विचारलं. इतक्यात  "हो आम्ही अकरावी-बारावीला करायचो प्लँचेट!" असं म्हणत दारात जर्नल मागायला अजिंक्य आला.
"म्हणजे तुम्हाला तुम्हाला भविष्यात काय होणार आहे ते कळायचं?"
"हो, आणि आत्मा सांगतो ते."
"आता मी हसू कि रडू काय कळेना यार, काहीही फेक ह.. साफ खोटं!" मी हसत हाताला हिसका देत म्हणालो. अजिंक्य म्हणाला "आरे माझ्याबद्दलच्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत! मला याचा अनुभव आहे. आणि मीही प्लँचेट करायचं शिकतोयसुद्धा. मला जमायलाही लागलंय."
"आरं तर मग चल कि लेकाच्या आपण पास होतो कि नाही ते बघुयात."
"आसं नाही करता येत ते, त्याला शांतता लागते, अंधार लागतो, मेणबत्त्या लागतात, त्याला आमवश्या किंवा पौर्णिमा लागते आणि त्याचे आणखी बरेच नियमपण आहेत." आता मात्र वांड्याने मान वर केली आणि म्हणाला "हे असलं काही करायचं नाही ह... हे सगळं थोथांड असतं. अंधश्रद्धा आहे ही! आरे सायन्स कुठं पोहचलं आहे आणि तुम्ही असले-कसले प्रकार करताहात."
"तुझ्या घरावरून न्यूटन-आईनस्टाईनचं विमान गेलंय कि काय रे? करून तर बघुयात न. आपण पास होतोय का नाही ते समजेल तरी!"
"काही नाही रे, वांड्या. सब झुठ है!" विल्ल्याने वांड्याला कोरस दिली.
"आता हे ब..घा... दि ग्रेट सायंटिस्ट मिस्टर विलियम फर्नांडीस!" मी विल्ल्याला टोमणा मारला.
"अरे माझं मत काही नाहीरे, पण तुम्हाला करायचं आहे तर करा..." पुन्हा विल्ल्या म्हणाला.
"ठरलं तर प्लँचेट करायचं!" मी प्रॅक्टिसची शीट गुंडाळून ठेवली आणि आणि आमवश्या किंवा पौर्णिमा कधी आहे ते पाहिलं. त्याच रात्रीच्या अडीचपासूनच आमवश्या सुरु होणार होती. अजिंक्यने प्लँचेटची तयारी करायला सुरुवात केली. रात्रीचे दीड-दोन वाजले असतील. त्याने एक मोठे शीट घेतले त्यावर त्याने एका बाजूला मोठ्या अक्षरात इंग्लिशमध्ये 'येस' आणि दुसऱ्या बाजूला 'नो' लिहिले, शीटच्यामध्ये ए टू झेड लेटर्स, शून्य ते नऊ अंक काढले. लोड शेडींगमुळं लाईट जायची त्यामुळं आमच्याकडं मेणबत्त्याही होत्या, त्याने ती शीट पसरून त्यावर तीन-चार मेणबत्त्या प्रेत्येक कोपऱ्यात लावल्या. आम्ही हे सगळं डोळे वटारून पाहत होतो. अजिंक्यने सगळ्यांचे मोबाईल बंद करायला सांगितले, ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि दरवाजा बंद करणार इतक्यात वरच्या मजल्यावरचा आमऱ्या फिजिक्सच जर्नल मागण्यासाठी आला. दरवाजा लावणाऱ्यापूर्वी त्यानेही आत येण्याचा हट्ट धरला, हे सगळं काय चालू आहे हे पाहण्याची त्याची कुतुहलता होती. घाईत मी अमऱ्याला रूममध्ये ओढला आणि अजिंक्यने दरवाजा बंद केला.

             मी, विल्ल्या, मयऱ्या, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या असे एका रूममध्ये होतो. पुन्हा एकदा नियम समजावून सांगितले. अजिंक्यने पुन्हा एकदा अतिशय शांतता राखण्यास विनंती केली. त्याने खिडकीवर चादर टाकली. लाईट बंद केली. आणि सर्व मेणबत्त्या पेटवल्या. शीटवर एक वाटी पालथी करून ठेवली. चौघांना वाटीवर बोट ठेवण्यास सांगितले आणि म्हणाला "वाटी हलायला सुरु झाली की समजायचं आपल्या प्रश्नांची उत्तर दयायला आत्मा आला आहे." मी, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या आम्ही वाटीला बोटाने स्पर्श करून पाहू लागलो. परंतु त्याने सगळ्यांना डोळे मीटण्यास सांगितले. आणि तो स्वतः संस्कृतमध्ये काहीतरी पुटपुटू लागला. मंत्राचा आवाज ऐकताच वांड्या ओरडला "ए..... बंद करा हे सगळं... काय चालवलय हे...? मला भीती वाटायला लागलीय.. अजिंक्य, आमऱ्याच्या आधी मला फिजिक्सच जर्नल दे, मला सबमिशन पूर्ण करायचं आहे!  लाईट ऑन करा पहिलं!" आणि त्यान उठून लाईट चालू केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. "अरे वांड्या, हे अर्धा तास तर करायचं आहे आपल्याला! बघुयात रे आपण, अजिंक्य कसा आत्मा  बोलावतो ते, आजून ते आलेलाही नाही." मी वांड्याला समजावण्याचा, त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु विल्ल्याच्याही अंगात पुन्हा विज्ञानाच भूत नाचू लागलं. तो म्हणाला "लेकाच्यानो, विज्ञानाने आजवर किती शोध लावले, तेच शिकायला आपण इंजिनीरिंगला एडमिशन घेतलंय न? राईटबंधूच्या विमानाचा शोध, एडिसनचा दिवा, ग्राहम बेलचा फोन असे काहीतरी संशोधन करा रे.. ही काय फालतुगिरी लावली आहे. विज्ञानामुळे माणूस वेगवेगळ्या ग्रहावर जावून आला, समोर कोणतीही क्नेक्टीविटी दिसत नसताना हजारो मैलावर असणाऱ्या माणसाला आपण बोलू शकतो, पाहू शकतो." हे ऐकत आमऱ्या पुढं आला आणि म्हणाला "वांडया म्हणतो ते खरंय.. मी वेगवेगळ्या ग्रहावर जाणारय, खगोलशास्त्रज्ञाप्रमाणे चंद्र, तारे पाहणारय. हे असल्या फालतू उद्योगांसाठी आमवशेची, पौर्णिमेची वाट नाही पाहणार, संशोधनासाठी वाट पाहणार.! चला रे आभ्यास करू, माझही फिजिक्सच सबमिशन बाकी आहे."  मी म्हणालो "येह... बस कर आता! मलाही माहितीय हे विज्ञान वगैरे, मीही तुमच्यातलाच एक आहे.. बाहेर काढा रे या बटाट्याला.... आत कोणी आणलं रे याला? आज आमवश्या आहे, आणि पुन्हा संधी दोन अडवडयाने किंवा महिन्याने येणार आहे. आपण फक्त प्लँचेटचा प्रयोग करून बघतोय याच्या आहारी थोडी जात आहोत." अजूनही यावर आमच्यात खूप चर्चा झाली. शेवटी प्लँचेट करण्यास वांड्या आणि सर्व तयार झाले.

            थोडावेळ मयऱ्याने आणि आमऱ्याने वांड्याला दाबून धरला. त्याला अजून थोडं समजावून जरा शांत केला. दुसरं भूत बोलवण्याच्या अगोदर त्याच्या अंगातल विज्ञानाचं भूत बाहेर काढणं गरजेच होतं. विल्ल्याचाही विरोध मावळला. विल्ल्या आणि वांड्याला आता शांत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुन्हा अजिंक्यने लाईट बंद केली, दरवाजा बंद केला. "आरे दरवाजा बंद केला तर आत्मा येणार कसा? त्याला दिसणार कसं?" आमऱ्याने मध्येच अजून खुसपट काढलं. अजिंक्य आता पुरता वैतागला होता, "यार...प्लँचेट राहू दे.. माझा मूड गेला आता...  असं करताना याला कडक नियमांचे पालन करावे लागते ... तुम्ही राव सगळी येडयाची जत्रा...!"
"नको नको... आता सगळे शांत बसतील, आपण सुरु करूयात प्लँचेट!" म्हणत मी सगळ्यांना एक शांततेची शपथ घालून लाईट बंद केली.  मी, वांडया, अजिंक्य आणि आमऱ्या पुन्हा आम्ही चौघांनी पालथ्या वाटीवर बोट ठेवलं. अजिंक्यने पुन्हा संस्कृतमध्ये मंत्र म्हणायला सुरुवात केली. पेटलेल्या मेणबत्त्याच्या उजेडात आमची तोंडंच फक्त दिसत होती. वाटी हळू-हळू हलायला लागली आणि वेगवेगळ्या अक्षरावर जावून थांबत होती. अजिंक्यच वाटी हलवत असल्याचे माझ्या लक्षात आलं. अजिंक्यने आत्मा आल्याच सांगितलं. कसला आत्मा? आता मला कळून चुकलं होतं, परीक्षेचा आभ्यास करायचा सोडून, सबमिशन करायचं सोडून आम्हाला कुठून असली दुर्बुद्धी सुचली देव जाणे. वांड्या, विल्ल्या खरा होता हे मलाही माहिती होतं पण आता जे चाललंय ते चालू द्यावं वाटलं. अजिंक्यने आत्म्यास प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू कोणाचा आत्मा आहे वगैरे वगैरे... दादा कोंडके, नथुराम गोडसे, चार्ली चापलीन अशा वेगवेगळ्या नावावर वाटी फिरून यायची. आमचे विषय निघतील काय? आम्ही पास होवू का? नोकरी लागणार का? याची गर्लफ्रेंड आहे काय? त्याची गर्लफ्रेंड आहे काय? गर्लफ्रेंड कोण? लग्न कधी होणार? आम्ही परदेशात कधी जाणार? असे ठरलेले टिपिकल प्रश्न आम्ही विचारत होतो. वांड्याचा ड्रॉईंग विषय निघेल का? मीही माझ्या मॅथ्स विषयावर प्रश्न विचारला, वाटी 'नो'कडे सरकली. आमऱ्याचा मॅथ्स विषय सुटणार का? विचारले असता वाटी  पुन्हा 'नो'कडे जाऊन थांबली. त्याच्या नोकरीबद्दल विचारल्यास वाटी सूसाईड या शब्दावर सरकत राहिली. सगळीच उत्तरं विचित्र येत होती, हे सगळं अजिंक्यच करत होता हे माझ्या लक्षात आलं होतच पण मी आता बाकीच्यांच्या प्रतिक्रियेसाठी प्लँचेटमध्ये सहभागी होतो. आमचा सगळा मूर्खाचा बाजार संपल्यानंतर आम्ही अजिंक्यला जाम शिव्या दिल्या, त्याची होती नव्हती, तेवढी सगळी अक्कल काढली. मी, विल्ल्या, वांड्या आम्ही सगळे अजिंक्यवर जाम चिडलो. वांड्या पुन्हा पेटला "हे असले उद्योग करण्यापेक्षा अभ्यास करा, राहिलेले विषय तरी निघतील." पुन्हा एकदा त्याने विज्ञानावर आणि अंधश्रद्धेवर भलं मोठ लेक्चर झाडून दिलं आणि सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. काही दिवसांनी हा प्रसंग आम्ही सगळेच कधीच विसरून गेलो होतो. आता होस्टेलवर सबमिशन आणि परीक्षेचे वारे जोरात वाहू लागले होते. पीएलच्या सुट्टी अगोदर सबमिशन संपवयाचे होते. नंतर सुट्टीत जोमाने अभ्यास करायचा होता.

            परीक्षा जवळ आली होती. राहिलेले विषय सोडवायचे होते. अभ्यासासाठी कोण लायब्ररीत, तर कोण कुठल्या झाडाखाली, कोण रूममध्येच तर कोण होस्टेलच्या गच्चीवर जात असे. आम्ही सगळे मित्र जेवढ्या जोशात क्रिकेट खेळायचो, कँटीनमध्ये गप्पा मारत बसायचो, फिरायला जायचो, पिक्चरला जायचो, होस्टेलमध्ये गाणी म्हणायचो तेवढ्याच जोमाने आभ्यासही करायचो. मे महिन्यात आमची परीक्षा असायची, सगळ्यांनी पेपर दिले, परीक्षा देवून झाली. ग्रुपमधल्या सगळ्यांना दुसऱ्या सेमिष्टरचे पेपर सोपे गले. ज्याचे पहिल्या सेमिष्टरचे विषय राहिले होते त्यांनाही पेपर सोपे गेले. परीक्षा संपली कि आम्ही चालत ज्योतीबाला जायचो, उन्हाळ्याचे दिवस असल्याने गप्पा गोष्टी करत फिरत, डोंगर-दऱ्यातल्या झाडावर चढून आंबे-जांभळ चाखायचो, होस्टेलच्या दिवसांची मजा कुछ औरच असते. जोतिबाच्याही पाया पडताना अगदी लहाण मुलासारखं आमचे सगळे विषय निघू दे असं निर्लज्जासारखं मागणं मागायचो. परीक्षेनंतरचे दोन-तीन दिवस असे घालवल्यानंतर सुट्टीला प्रत्येकजण आपआपल्या गावी गेला. काही दिवसांनी पहिल्या वर्षाचा निकाल लागला सगळे पास झाले होते. प्रत्येकानं आपापल्या गावावरून ग्रुपमधल्या प्रत्येकाला फोन करून निकाल विचारला. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्स विषय पुन्हा राहिला होता तरीही आम्हाला दुसऱ्या वर्षाला अडमिशन मिळणार होते, परंतु आम्हाला दुसऱ्या वर्षात हा विषय काढणे गरजेच होतं तेव्हाच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं. दुसऱ्या वर्षाच अडमिशन झाल्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा मॅथ्स विषयाचा अभ्यास जोमाने चालू ठेवला. पहिल्या वर्षापेक्षा दुसर वर्ष लवकर संपल्यासारखं वाटलं, मॅथ्सच जसंच्या तसं टेन्सन होतं, दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिष्टरलाही पुन्हा आमचा मॅथ्स गेला. आम्ही पुन्हा त्यात पास होऊ शकलो नाही. कधी कधी असं वाटायचं कि "काय पाप केलं आणि या गणिताच्या जाळ्यात अडकलो." बऱ्याच जणांनी गणित आणि ग्राफिक्स या सारख्या महाभयंकर विषयांनाला म्हणजेच ड्रॉईंगला वैतागून पहिल्या वर्षातच इंगीनीअरिंगच अडमिशन कॅन्सल केलं होतं. आता आमच्या पुढं मॅथ्स पास होण्यासाठी एकच परीक्षा उरली होती. ती म्हणजे दुसऱ्या वर्षाची दुसरी सेमिष्टर. आमच्यासारखीच वांड्याचीही अवस्था होती, त्याला ड्रॉईंगमध्ये पास होणे आवश्यक होतं. तो ड्रॉईंगमध्ये फारच कच्चा होता आणि आम्ही गणितामध्ये. मी आणि आमऱ्याने रेटून अभ्यास चालू केला. मी वांडयाबरोबर लायब्ररीत अभ्यासाला जायचो. त्याला थोडे मोठ्याने वाचायची सवय होती, प्रश्न वाचला कि तो दोन वेळा पुटपूटायची सवय होती. तोंडी परेक्षेला परीक्षकाने प्रश्न विचारला की उत्तर आठवण्यासाठी वांडया तोच प्रश्न पुन्हा पुटपुटायचा, त्याला अशी गजब सवय होती. एकदा तर परीक्षक म्हणाले "डोंट आस्क टू मी, आय एम अस्किंग टू यु!"

           असंच एके दिवशी रात्री लोडशेडिंगमुळे लाईट गेली होती, पिटक्या त्या दिवशी लवकर झोपला होता, उघडा होवून अगदी कुंभकर्णासारखा घोरत होता. तो दुसऱ्या दिवशी लवकर उठून अभ्यासाला लायब्ररीत जाणार होता. वरच्या मजल्यावरून आमऱ्या आला त्यानं पिटक्याच्या रूममध्ये घुसून मेणबत्ती मागितली. त्यादिवशी माझ्या आणि इतर मित्रांच्या रूममध्ये, कोणाकडच मेणबत्ती मेणबत्ती मिळाली नाही. त्याला कसाही दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास सुरु ठेवायचा होता, गणिताचा सराव करायचा होता. शेवटी त्यानं छोट्या मशालीच्या उजेडात अभ्यास करायचं ठरवलं. मशाल बनवण्यासाठी छोटी काटकी आणली, अंधारात कापड शोधू लागला, होस्टेलच्या पॅसेज्यमध्ये  त्याला एक मळके कापड सापडलं, त्यातले अर्धे कापड त्याने फाडून काटकीच्या एका टोकाला गुंडाळलं आणि त्यावर पिटक्याच्या रूममधले खोबरेल तेल ओतून ती दिवटी पेटवून पुन्हा वरती अभ्यासाला गेला. दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावरचे आम्ही सगळे लवकर उठलो. अंघोळीसाठी रांगा लागल्या. पिटक्या बाथरूममधून लेडीजचा आखूड टॉप किंवा ब्लाऊज पिसचा जम्पर घालून आल्याचं  चित्र पाहून आम्ही खिदळून खिद्ळून हसलो. त्याचा अर्ध्यातून खालचा बनियन आमऱ्याच्या दिवटीला वापरला गेला होता. 
  
               काहीही करून आमचा अभ्यास चालू असायचा. त्यावेळीही इंजिनीअरिंगच्या फीज महाभयंकर होत्या त्यामुळं याचाही तणाव असायचा. बऱ्याच मित्रांचा हा विषय पहिल्या, दुसऱ्याच प्रयत्नात सुटला होता, त्यांचा पुढचा अभ्यास चालू असायचा. त्यामुळ बाकीच्या मित्रांची आम्हाला आता जास्त मदत होत नव्हती, तरीही आम्ही एकमेकांच्या मदतीन गणितं सोडायचो, सराव करायचो. दुसऱ्या वर्षाचा एखादा विषय राहिला तरी चालेल पण पहिल्या वर्षाचे सगळे विषय सुटले पाहिजेत तरच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं . त्यादिशेनेच आमचा प्रयत्न चालू होता. आता आमचं दुसऱ्या वर्षाचं सबमिशन संपून परीक्षा सुरु होणार होती. परीक्षेच्या सुरुवातीला मागच्या वर्षीच्या विषयांचे पहिले पेपर होते. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्सचा आभ्यास चांगला झाला होता. आम्ही पेपर देवून आलो, दोघांनाही पेपर सोपा गेला. माझा विषय निघेल कि नाही याबद्दल माझ्या मनात जरा शंकाच होती. आमऱ्या पूर्ण आत्मविश्वासाने सांगत होता कि त्याचा विषय निघणार, तो पास होणार म्हणून! त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगत होता. वांड्याही त्याच्या जोडीला होता, तो ड्रॉईंगमध्ये स्कोरिंग घेवून पास होणार असल्याची खात्री देत होता. माझा मात्र चेहरा पडला होता. त्यात आम्ही बाकीचे सर्व पेपर दिले. ग्रुपमधल्या सगळ्यांना पेपर सोपे गेले. मला आणि आमऱ्याला दुसऱ्या वर्षाच्या पेपरच जास्त टेन्शन नव्हतं पण त्याहीपेक्षा पहिल्या वर्षाच्या मॅथ्सचं जास्त होतं. दुसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यानंतर आम्ही पुन्हा ज्योतीबाला गेलो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो. एक-दोन दिवसांनी सगळे आपआपल्या गावी गेले. मी जेव्हा जेव्हा पंढरपूरला येत असे नव्हे मी कॉलेजचं सगळं टेन्शन डोक्यातून काढून सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असत, परंतु या वेळेला चित्र वेगळं होत. थोडं टेन्शन होतं. दहावी-बारावीला जितकी वाट पाहिली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मी निकालाची वाट पाहत होतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमचा निकाल होता. चार जूनला माझ्या घरी मला वांड्याचा फोन आला. माझ्या भावाने फोन घेतला होता, नगरहून अभिजित बोलत असल्याचे सांगितले. मी फोन घेतला, "हं बोल वांडया!"
"आरे तुझा मॅथ्स निघाला.."
"काय सांगतो?" माझ्या चेहऱ्यावर बारीकसे हसू खुलले. "... आणि तुझा ड्रॉईंग रे?"
"हो मी जरा जास्तच स्कोर केला आहे, मलाच समजत नाहीय कसं काय ते... आमऱ्याचं कळलं का ?"
"हं त्याचा मॅथ्स निघाला का..?"
"त्यानं आत्महत्या केली, आता तो आपल्यात नाहीय.."

मी सुन्न झालो. काय बोलावे मला कळेना. माझ्या डोळ्यासमोर फक्त आमऱ्या दिसत होता. काही वेळ मी स्वप्नात असल्यासारख वाटलं. तो असं-कसं करू शकतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. पुढचं बोलणं सोडून दिलं आणि मी फोन तसाच ठेवून दिला. अर्धाभर तास तिथंच गुडघ्यावर बसलो. माझे डोळे भरून आले होते. माझ्या डोळ्यासमोर आम्ही आभ्यास करतानाच चित्र दिसत होतं. माझे बाबा माझ्या जवळ होते. "आरे नापासच झाला, मग काय झालं आपण पुन्हा परीक्षा देवू, इतकं  भयंकर असं का खचून जातोय? आपण गेलेला विषय पुन्हा सोडवू." मला धरून उठवत म्हणाले.

"माझा मित्र हे  जग सोडून गेला, त्यानं आत्महत्या केली." हे ऐकताच आमच्या घरातील सगळ्यांनाच वाईट वाटले. मी डोळ्यातील अश्रूंना मोकळी  वाट करून दिली.

         होऊ शकेल की आत्तापर्यंत आमऱ्या चुकला, जगाला समजायला. प्रेम, वेदना, जगणं आणि मरणं समजायला. अशी काही घाई गडबड देखील नव्हती. फक्त एक वर्ष वाया गेलं होतं. आमच्या होस्टेलवर नापास झालेली पोरं होतीच ना आमच्याबरोबर मजा-मस्ती करायला. पण तोही नेहमीच मजा-मस्ती जगण्याच्या घाईत दिसायचा. या सगळ्या कालावधीत कधी इतका अस्वस्थ दिसला नाही. तो असं काही करेन असं काही वाटलं नव्हतं. आमऱ्या त्याच्या बालपणाच्या एकटेपणातून कधी बाहेरच येऊ शकला नव्हता. लहानपणी त्याला कोणाकडूनच प्रेम मिळालं नसल्याचं कानावर पडलं होतं. त्यानं इतक्या टोकाचा निर्णय घेतला यावर विश्वास बसत नव्हता. आत्महत्या या कधीच साध्या सरळ नसतात. फार गुंतागुंतीच्या असतात. म्हणजे माणसाने आत्महत्या केली ही गौण गोष्ट नसते. त्याबरोबरच होजारो प्रश्न उभे राहतात. कोणालाही जबाबदार धरू नये म्हणून त्यानं स्वतःला संपवण्यापूर्वी चिट्टी लिहिली होती. लोक त्याला पळपुटा घोषित करतील, स्वार्थी देखील, मूर्ख देखील म्हणतील जेव्हा तो निघून गेला होता. आता त्याला काही फरक नाही पडत लोक त्याला काय म्हणतील. आता तो या दुनियेत नव्हता. तो मृत्यूनंतरच्या कथा, भूतप्रेतांमध्ये विश्वास ठेवत नव्हता. जर कोणत्या गोष्टीवर त्याचा विश्वास असेल तर ती ही की मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेन आणि समजू शकेन की त्याची दुसरी दुनिया कशी आहे?

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आम्ही अडमिशन घेतलं. पुन्हा दुसऱ्या वर्षाचेही राहिलेले विषय बरोबर होतेच. आमचा ग्रुप आमऱ्याला खूप मिस करत होता. कारण सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या फिरायला तो आमच्या बरोबर नव्हता. राहिलेल्या विषयांचा अभ्यास करायला नव्हता. आमऱ्याचा निकाल आणायला मयऱ्या आणि पिटक्या गेले होते, त्यानं निकाला अगोदरच हे टोकाचे पाऊल उचलले होते. त्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळाले होते तो पासही झाला होता. माझाही अंधश्रद्धेवर काडीमात्र विश्वास नाही आणि अंधश्रद्धेच समर्थन मी कधी केलंही नाही. त्याच्या घरचा, काहीतरी कौटुंबिक प्रोब्लेम असल्याचे समजले होते. प्लँचेट ती गोष्ट खरी झाली होती की त्यानं कौटुंबिक तणावातून आत्महत्या केली? आजही आम्हा सर्वांना हा प्रश्न पडतो आणि आम्ही पुन्हा हादरून जातो. प्लँचेटची ही गोष्ट आम्हा सर्वांना थक्क करणारी होती. तेव्हापासून आम्ही प्लँचेट करण बंद केले.

Saturday, May 5, 2018

एक श्रीमंत माय...

       दिवस मावळतीकड झुकला होता, चहाचा कप घेऊन मी गच्चीवर गेलो, वरती पोहचताच एक मोठा श्वास घेत सगळीकड नजर फिरली. एका बाजूला विठ्ठल साखर कारखान्याची चिमणी बकाबका धूर सोडत होती, सरकारांच्या पडीक रानातल्या लहान-मोठ्या बाभळीन्नी तोंड वर काढली होती, सूर्य त्यामाग दडण्याचा जणू अट्टहास करत होता, गावाकडच्या बाजूला विठ्ठल मंदिराच्या कळसाची अस्पष्ट ओळख दिसत होती, त्याबरोबरच भजनाच्या टाळ- मृदूंगाचाही आवाज कानी पडत होता. आमच्या रानाकड नजर फिरली, ऊसाने नुकताच तुरा टाकलेला दिसत होता. नदीकडच्या बाजूनं बगळ्याचे थवे परतताना दिसले.  शेवटी लालसर झालेल्या आभाळावर नजर स्थिरावली, पांढरे, काळे, लाल, निळे अशा वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे आकार दिसत होते, नजर जरा स्थिरावली..,  अडकल्यासारखी झाली.

      "आरे...! जरा माग सरून बस..!" असा एक जवळीकता साधणारा आवाज काणी पडला. क्षणभर वाटले, आईने आवाज दिला असावा अशी त्यातही आपुलकी दडली होती. आभाळाकड पाहिलं, एक निरागस चेहरा माझ्याशी बोलू पाहतोय.. नकळत मी दोन पावलं मागं गेलो, थोडं दचकल्यासारखं झालं.  "तुला माझ्याबद्दल सारखं एक कोडं पडतं कि मला जन्म कोणी दिला ? मी अजून किती मोठा आहे ? मी हे विश्व व्यापले आहे कि विश्वाने मला व्यापले आहे? मला आकार-उकार कोणी दिला? " आणि त्याला जणू या सर्व गुढाचं विश्लेषण करायचं होत, परंतु त्याने ते हसून टाळलं. तो का हसतोय असा विचार करेपर्यंत त्याने पुढे बोलायला सुरवात केली.  "प्रत्येकजण मझ्याकड वेगळ्या भावनेने बघतोय, गड्या..., तू जर उद्या प्रियकर झाला, तर चांदणी चंद्रासोबत काय अल्लड चेष्टा करत बाजूला जणू नृत्य करत असते, हे  तूही पाहशील जसे कि आज तू असे बहुत प्रश्न डोक्यात धरून पाहतोय! कोण मला दूरदर्शी भिंगातून बघून सिद्धतांचे उलगडे करण्यात रमला आहे तर... तर कुणी रानांत डुलणारं पिक पाहून जरा आनंदाने न्हाहत आहे, कुण्या भागात माझ्यामुळं डोळ्यात अश्रूही आहेत." येवढ ऐकताच क्षणातच त्यानं रंग बदलला लालसरचा जरासा काळसर झाला.

       "कदाचित माझ्यामुळही महाराष्ट्राचे दोन तुकडे होण्याची वेळ आली आहे, असं काहीस मलाही वाटतं, माझं अन मान्सूनच तिकडं काही पटलच नाही बघ, माझ्या हातात तर काही नाही, गड्या! मला सूर्यकिरण, समुद्र  अन वाऱ्यान साथ दिली, तर पाहिजे खरं! जेव्हा विदर्भातला शेतकरी डोळ्यावर हात धरून वरती पाहत असतो,  तेव्हा मदतीसाठी पुढं जाणारे माझे हात कुणीतरी धरून ठेवतंय असं वाटतं, याचमूळ आज आत्महत्येची वेळ आलीय यात मला दोषी धरलं जातं. माझ्याकडं इंद्रधनुष्याच्या निम्मित्तान पाहणारे लोक इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या विचाराचे आहेत रे!" त्याचा कंठ दाटून आला होता, काळसर झालेल्या चेहऱ्याकडं पाहून आता पाऊसाला सुरुवात होईल असं वाटलं. जरा वेळ त्याने डोळे मिटले आणि माझ्या कपाळावर पाण्याचे दोन थेंब पडले.  आपल्याला तळमळीनं सांगणारा व्यक्ती आपल्या जवळचाच असतो, असा विचार माझ्या मनात खेळतो तोच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली  "रात्रीच्या वेळी चिमुकली मंडळी जेव्हा चांदोमामा, चांदोमामा भागलास का ? म्हणून गात असतात त्यांच्याकड पाहून मलाही वाटत, कि ते गोंडस बालपण मलाही अनुभवता यावं, माझ्याही चेहऱ्यावर तो बालिश आनंद असावा, पण जेव्हा रात्रीच्या वेळी अनाथ मंडळी चांदण्यामध्ये आपले आई-बाबा शोधतात तेव्हा  मला आठवते ती आगळीवेगळी माय.. सिंधुमाई... धन्य ती माऊली, धन्य तिचं कार्य. जेव्हा ती माऊली बोलत असते, केवळ ऐकत रहावसं वाटतं. भारताची संस्कृती मूळतः स्त्रीप्रधानच होती. नंतर वैदिक परंपरामुळे स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिलं गेलं. आणि त्यामुळेच अशा उद्रेकातून अशा क्रांतिकारी स्त्रिया जन्म घेत गेल्या. पुरुषप्रधान संस्कृतीने या माउलीला कायमच एक चिंधी म्हणून हिणवलं. चिंधीचे अल्पवयात लग्न झालं. या चिंधीची ही माऊली सौ. चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते केवळ अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी खूप सासुरवास आणि मेहनतही करावी लागत असे. खूप यातना भोगल्या आहेत त्या माऊलीने."
हे सर्व सांगताना तो आपल्याच आईबद्द्ल सांगत होता, असे काहीसे भासत होते.

         मी मन लावून ऐकत होतो. त्याने तसेच पुढे बोलणे चालू ठेवले. "अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील खूप मोठा संघर्ष केला. तेव्हा गुरं  राखणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुरं ही शेकडो असायची त्यांचे शेण-घाण काढता काढता कंबरठे मोडायचे. लेकुरवाळ्या स्त्रीसाठी मोठे कष्टाचे काम. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्यासाठी माईना कसलीही मजुरी मिळत नसे, म्हणून माईंनी बंड पुकारला. माई हा लढाई जिंकल्या पण या लढ्याची किंमत त्यांना मोजावी लागली. बाईच्या या धाडसामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण त्याला जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली होती आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले होते. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपलच असल्याचा खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे माईंचे पती श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले कारण माईंना गोठ्यातल्या गाईनी तुडवून मारावे. त्या अवस्थेत त्यांना मुलगी जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना गावातूनही हाकलून दिले. माराने जखमी झालेल्या माई माहेरी आल्या पण त्यांच्या सख्या आईनेही पाठ फिरवली."

         "पोट भरण्यासाठी भिक मागणे हा एकमात्र पर्याय उरला. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. कारण त्यांना स्मशानच सर्वात सुरक्षित वाटत असत कारण भुताच्या भीतीने तिथं कुणी येत नसे. ती माय जनावरात वाचली आणि भूतात राहिली असे म्हणायला हरकत नाही. पण पोटातल्या भुकेच काय? भूक तर रोजच लागते. असाच एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघून गेले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली. असाच एक दिवस. एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते."
बोलता बोलता तो मध्येच जरा शांत बसायचा. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. मी त्याच्या चेहऱ्याकडंच बघत ऐकत होतो.

    "आपण जे जगलो ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती, कारण आई ही शेवटी आई असते. निराश्रीतांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले कारण एका आईकडून स्वतःची मुलं आणि दान घेतलेली मुलं यात फरक होऊ नये. आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. आजही अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात."


     आता त्याला शब्द फुटत नव्हता, कंठ दाटून आला होता. तरीही तो पुढे बोलू लागला. "आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच अनाथ मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. मोठ्या होत आहेत.  दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत हजारो त्यांची मुले आहेत. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे. त्या म्हणतात पुरस्काराने पोट नाही भरत, माझा संघर्ष जगण्याशी आहे. जणू मीही सुरेश भट, बहिणाबाई, विं. दा., सावित्रीबाई फुले यांचच जीवन जगत आहे.  माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. कारण मी पाहिलेल्या माईंमध्ये हीच सर्वात श्रीमंत माय होती, कारण ही अनाथांची माय होती." हे शब्द पूर्ण होता न होताच आकाशातून पाउसाला सुरुवात झाली , गडगडाट झाला, जणू त्याने एक हुंदका देऊन डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून  दिली. तोच खालून आवाज आला, "गणू, वैरण गोठ्यात टाक अन गाई आत बांध...!"  गाई गोठ्यात बांधायला मी धावणार तोच हातातला चहा पाहीला, तो कधी थंड झाला याचे भानही राहिले नव्हते, मी जीना उतरून हंबरडा फोडणाऱ्या वासराकडे धाव घेतली ज्याची आई काही दिवसापूर्वीच त्याला सोडून गेली होती.

Published as 'Sindhumaaichee Naarishakti' in Saptahik Pandhari Vaarta (17 October 2018) on the occasion of Navratri.

Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. on the occasion of International Women's day (8 March 2018)

Sunday, January 22, 2012

कर्मवीर

              दिवस कासराभर वर आला होता. तांदूळवाडीत सगळ्यांची सकाळची तयारी होऊन चहा- पाणी चालू होते. कोण शेतात तर कोण दुधाच्या डेअरीवर जात असताना दिसत होते. आबा हाताची घडी चालून अंगणात ये-जा करत होते, कदाचित त्यांना कसलीतरी चिंता असावी. शेजारचा गणपा हौदावर अंघोळ करत होता.   अंगावर साबणाचा कापसागत फेस करत लावणी गुणगुणत होता, हौदाच्या पलीकडून कोंबड्या ओरडलेला आवाज चालू होता. आबांच्या घरातून लसणाच्या फोडणीचा वास सुरु झाला. आबांना घराशेजारून जाणऱ्या रस्त्यारून हरिदास दुधाच्या दोन किटल्या घेऊन जाताना दिसला, दोघांची नजर भिडताच एकमेकांना  राssम-राम...!  असा आवाज दिला. आबांच्या दारात दावणीला बांदलेली बैलं शिंगाड हलवत होती, अधून-मधून त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज कानी पडायचा. आबांच्या चेहऱ्यावर मात्र रात्रीपासून बरीच चिंता दिसत होती. आबा ये-जा करत कोणता तरी मोठा विचार करत असल्यागत दिसत होते, मध्येच एका बैलान बारीकसा हंबरडा फोडला, आबांनी कडब्याच्या दोन पेंड्या बैलापुढ टाकल्या. पुन्हा आबांची ये- जा सुरु झाली, मधून आबांची नजर गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर पडायची. आबा रात्री पासून बेचैन होते, लवकर झोप लागली नव्हती, या अंगावरून त्या अंगावर करत होते, दोन-तीनदा अन्थूरनातून उठून त्यांनी भिंतीवरचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो पाहिला होता.

              मागच्याच महिन्यात त्यांनी आपल्या मुलीच लग्न उरकून तिला हसत सासरी पाठवलं. आबा तसे कठोर काळजाचे आणि धीराचे. त्यांचा मुलगा लक्ष्मण उजाडायच्या आत गावात गेला होता. तसा लक्ष्मणची हा वेळ नेहमीप्रमानं  वर्तमानपत्र आणून वाचत बसण्याची, पण आज तो कुठ गेला होता याची त्याच्या आईला कल्पना नव्हती. दोन महिन्याच्या सुट्टीत लक्ष्मणने शेत्तीतील कामात बराच हातभार लावला, लक्ष्मणाने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती.
                 आबा मात्र पुनःपुन्हा गावाकडून येणाऱ्या वाटेवर नजर टाकत होते. आता त्यांच्या कपाळावर आट्या पडलेल्या दिसत होत्या, मध्येच बैलाकड नजर तर कधी घड्याळाच्या काट्याकड! 
"आता रानात गेलं पाईजी...." ते स्वतःशी पुटपुटले.
त्यांनी पुन्हा बैलाच्या दावणीतील वैरण आहे का? बघीतली. खोऱ्या घेऊन ते थोड्या अंतरावर असलेल्या रानाकड गेले, मोटार चालू करून ते पाण्याकड कमी लक्ष्य आणि वाटेकड जास्त लक्ष्य देऊ लागले. ऊस चांगला कंबरेला आला होता.

            दोन वाफे भरत आले, आता दिवस डोक्यावर आला होता. न्याहारी करण्याची वेळ आली. त्यांच्या कपाळावर घाम काढत आबा मध्येच मोठ्या श्वासाचा व्हुसकारा टाकत.. वाफ्याचे एक-एक दार मोडायचे त्यांचे काम चालू होते... आबांना तेवढ्यात लक्षमण गावाहून पळत येताना दिसला, ऊसाच्या रानात त्याला आबा दिसले.

आबा उसातून बांधावर आले. आबा आणि लक्ष्मण एकमेकांच्या जवळ आले. लक्षमण थोड्या अंतरावर असताना तो आबांना म्हणाला
"आबा, मी जिल्ह्यात पहिला आलू..."
आबांचा चेहरा पटकन मोठा झाला, कपाळावरच्या आट्या दूर झाल्या, किती हसावं कळेना, चेहऱ्यावरची चिंता दूर झाली. आनंद पोटात मावेना. त्यांनी लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून चिखलाचा हात फिरवला आणि घट्ट
मीठी मारत... 
"लै शिकं पोरा... लै मोठा हो...  भाऊराव पाटलांच्या वडायेवढा मोठा हो!"
टपकन आबांच्या डोळ्यातून अश्रू  ओघळले. आबांच्या तोंडात साखर घालून, लक्षमणाने त्यांचे चरण स्पर्श करत बोलला... "व्हय, आबा व्हय..!" आणि त्यान त्याच्या आईसाठी घराकड धाव घेतली.. त्याच्या फिरलेल्या पाठीकड बघत, आबा पुटपुटले "तू काय बी काळजी करू नगसं.. फकस्त लै शिकं.! "
  

Published in Dainik Pandhari Bhushan, Pandharpur. on the occasion of birth anniversary of Karmveer Bhaurao Patil (22 Sept. 2018).

Sunday, November 20, 2011

Everything is fine, Now.

            There were tears in my eyes while I was reading it the first time. It is a small heart touching story, I had read it on Facebook on my friend's post.

            One day, In a family, One young son of an old father enters the home from his office work, throwing out his shoes and soxes at the corner of the hall. At some moment, Old father comes out from his room and asks his son with a little cough,
"Son, you came? good."
"Did you bring my medicine given by the doctor?"

And son answers,
"No father, I forgot..! I am too much tired now. I will bring it on tomorrow."

The old father replies,

"Ok, No problem. You are too much-tired son. Have a rest."(Cough)
"Do you want some tea, milk?"

Son says,
"No, thanks!"

The old father replies,
"Anyway, have a rest. Good night."

Accidentally, At midnight old father has some uncomfortable feelings and sweating out due to a lack of doses of medicine. He calls to his son with a loud voice,
Till he comes into his father's room father leaves his life. old father dies.

So many days pass, After many days, While cleaning out his house because of some festival younger son found his old father's dairy in one cupboard.
He started to read.

He reads....,
There was raining at midnight. And my child Honey was not feeling well due to an increase in his cough and cold. All hospitals were shut down. I had gone to the doctor's home with an umbrella and honey was covered by a blanket on my soldier. On that night, the Doctor gave a good prescription. And my honey is well and fit now. Don't worry. Everything is fine, Now!