Search in Google

Monday, January 30, 2012

गीता ग्रंथ आणि गांधी


             कालच गांधीचे आत्मचरित्र वाचून झाले, गांधीनी आपल्या आत्मकथनामध्ये  सत्याचे प्रयोग आणि विवध  धर्मांच्या विचारांची उत्तम रित्या सांगड घालत आपली जीवन शैली रेखाटली आहे. प्रथमतः त्यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल जरा द्वेष दर्शवला असून हिंदू धर्माचे गोडवे गायले आहे, अर्थात तेव्हा गांधी इतर धर्माच्या जास्त परिचयात नसत. 'धर्माचे मंथन' या प्रकरणावरूनच त्यांनी विविध धर्म ग्रंथ वाचलेले सांगितले आहे. त्यात गांधींनी येशू ख्रिस्तांचे उत्तम उदाहरण दिले असून, अहिंसा आणि सहनशीलता या दोन गुणांना धरूनच त्यांनी 'एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करावा ' हे सूत्र जोपासले असावे, हेच  त्यांनी 'अहिन्सादेवीचा साक्षात्कार' या  प्रकरणात सांगितले आहे. ते विलायतेत असतानाहि ख्रिस्ती मित्रांशी बुद्ध चरित्र आणि जैन ग्रंथ जगाने का स्वीकारले हे त्यांनी पटवून दिले नाही. अर्थात हे ग्रंथ विश्वशांतीचा संदेश देतात. दया, क्षमा, शांती, अहिंसा, प्रेम, सत्य, विश्वास हेच गुण म्हणजे परमेश्वर असे सांगणाऱ्या गोतम बुद्धांचे विचार लोकांना इतके पटले कि परमेश्वराच्याहि पलीकडे बुद्धांनी बुद्धीष्टांच्या मनात घरे केली.

    ज्याप्रमाणे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लार्ड यांनी अहिंसावादी गांधींनी हिंसा दर्शवणारी गीता या ग्रंथाचे कौतुक कसे केले असा प्रश्न उपस्थित केला आहे,याच वादावरून रशियामध्ये या ग्रंथावर बंदी आली आहे, तर याचे उत्तर देता येईल कि ज्ञान आणि आत्मा हे गुणधर्म  सांगण्यासाठी केवळ हिंदू धर्म ग्रंथचे वर्णन केले असावे, अर्थात त्यांनी अहिंसेचे गीता हे प्रतिक नाही असे नमूद केले नाही.  आणि अहिंसेसाठी ख्रिस्ती धर्म ग्रंथ आत्मसात करायला सागितले आहे.यावरून असे दिसून येते कि कोणत्याही धर्मियांचे मन दुखावले जाणार नाही, याची गांधीजींनी  दखल घेतली असावी. दुसरी बाजू पाहिली असता गीता हा धर्म ग्रंथ होऊ शकत नाही असेहि काही विचारवंत म्हणतात, याला भारतीय युद्धाची पार्श्वभूमी दिल्याने एक भावनिक स्वरूप मिळाले आहे.